पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

श्री.काशिनाथ गवळे यांची आपला महाराष्ट्र लोकल न्यूज चॅनेलवर प्रसारित झाल...

इमेज

मागासगर्वीयांसाठी शासकीय वसतिगृह योजना GOVERNMENT HOSTEL SCHEME

इमेज

रमाई घरकुल योजना- RAMAI GHARKUL YOJANA

इमेज

”वसतिगृहाद्वारे स्मार्ट शैक्षणिक विकास“ हा दै.सकाळ या वृत्तपत्रात दि.२८ मे २०१६ रोजी प्रसिध्द झालेला प्रादेशिक उपायुक्त मा.श्री.काशिनाथ गवळे यांचा लेख

इमेज

”सामाजिक समतेसाठी शैक्षणिक संधी“ हा दै.सकाळ या वृत्तपत्रात दि.३० मे २०१६ रोजी प्रसिध्द झालेला माझा लेख

इमेज

दादासाहेब गायकवाड यांच्या स‌्मारकांचा कामाला गती

इमेज

सामाजिक न्याय वर्षाची फलश्रृती…!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षा निमित्त शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने राबविलेले उपक्रम, योजना, घेतलेले निर्णय, राबविलेले कार्यक्रम यांचा विस्तृत आढावा घेणारा लेख ! ------------------------------------------------------------------------------ सामाजिक न्याय वर्षाची फलश्रृती…!             भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्ताने शासनाच्या वतीने सन 2015-16 हे वर्ष ‘ सामाजिक न्याय व समता वर्ष’ म्हणून साजरा केले जात आहे. या वर्षानिमित्त शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध ठोस उपक्रम राबविण्यात आले. शाश्वत विकासावर भर असलेले लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले. सामाजिक न्याय वर्षासाठी शासनाने 125 कोटी रूपयांची तरतूद उपलब्ध करून दिली. सामाजिक न्याय व समता वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या  फलश्रृतीचा, यशस्वीतेचा घेतलेला हा आढावा !             अंध व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदत करणे ही झाली समाजसेवा ! मात्र या अंध व...

नाशिककरांना “महासुर्य“ या महानाटयांची २ मे रोजी पर्वणी

इमेज
नाशिककरांना “महासुर्य“ या महानाटयांची २ मे रोजी पर्वणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजन             डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने शास नाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यात “ दूत समतेचा… जागर महामानवाचा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गंत सोमवार दि.२ मे २०१६ रोजी प्रतिभा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर द्वारा प्रस्तुत व सम्यक थिएटर,नागपूर द्वारा निर्मित “ महासुर्य “ या महानाटयांचे नाशिक येथे आयोजन करण्यात आले आहे.           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित असलेले, १२५ कलावंताच्या ताफांसह, भव्य‍-दिव्य मंडप, उच्च दर्जांची ध्वनि-प्रकाश योजना ,नेपथ्य, रंगछटा यांचा सुरेख मिलाप असलेले महासुर्य या महानाटयाची अनुभूती घेण्याची पर्वणी नाशिककरांना चालून आली आहे. सामाजिक न्याय विभागाने ही पर्वणी नाशिककरांना उपलब्ध करून दिली असून महानाटयाचा हा प्रयोग गोल्फ क्लब येथील ईदगाह मैदानावर सायंकाळी ६.३०...

सामाजिक न्याय विभागामार्फत ”डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कार”

इमेज

सामाजिक न्याय विभाग १२५ जणांना देणार पुरस्कार

इमेज

समाज कल्याण विभाग डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराने १२५ जणांना गौरविणार

इमेज

ॲट्रोसिटीच्या गुन्हयांचा त्वरित निपटारा करा-विभागीय आयुक्त श्री.एकनाथ डवले

इमेज

समाज कल्याण विभागाच्या योजना

इमेज

“माझ्या भिमरायाचा मळा.. ” आंबेडकरी गीतांचा २ एप्रिल २०१६ रोजी कार्यक्रम

इमेज

संविधान ओळख –माहितीपट (E.Z.KHOBARAGDE)

इमेज

प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांना आयकॉन पुरस्कार

इमेज

महिलांना समाज कल्याण विभागाकडून मदतीचा हात !

इमेज

प्रबोधनातून व्यसनमु्क्तीकडे- लोकराज्य मार्च-2016 अंक

इमेज

समता चित्ररथ नाशिक (निफाड) कार्यक्रम दि.07 मार्च 2016

इमेज

समता चित्ररथ नाशिक विभाग नंदुरबार, धुळे व जळगांव

इमेज

समता चित्ररथ धुळे

इमेज

शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा- प्रा. राम शिंदे

इमेज
अहमदनगर :  शासकीय अधिकाऱ्यांनी पदावर काम करीत असताना प्रामाणिकपणे आणि नि:पक्षपातीपणे शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून सामाजिक समता निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. नियोजन भवनामध्ये राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत प्रा. शिंदे बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष हे `समता व सामाजिक न्याय वर्ष` म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने सामाजिक न्याय विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, महापालिकेचे आयुक्त विलास ढगे, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, समाजकल्याणचे सहायक आयुक्त माधव वाघ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, हर्षल आगळे आदी उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले, शासकीय धोरणांची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासन ...

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेतील निधीच्या माध्यमातून जिल्हा माहिती अधिकारी,नाशिक यांच्या मार्फत एस.टी.महामंडळाच्या बसेसवर प्रसिध्द करण्यात आलेल्या योजनांचे बॅनर

इमेज

समता रथ व समता वर्ष बातमी-जळगांव

इमेज

आता घरकुल करिता जागा खरेदी करण्यासाठी 50 हजारांचे अनुदान

इमेज

प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक श्री.काशिनाथ गवळे यांची दै.देशदूत मध्ये दि.22.02.2016 रोजी प्रसारित झालेली मुलाखत

इमेज

डॉ.आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीतील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याचे नियोजन - राजकुमार बडोले

इमेज
अलिबाग :  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यात सामाजिक चळवळी केलेल्या आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्याचे राज्याचे नियोजन आहे. त्यानुसार महाड येथील चवदार तळे याचे सुशोभीकरण करावे तसेच येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाचा विकास करावा, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष 14 एप्रिल 2015 ते 14 एप्रिल 2016 हे "समता व सामाजिक न्याय वर्ष" म्हणून साजरे करण्यात येत आहे. या अनुषंगाने 26 जानेवारी ते 14 एप्रिल 2016 पर्यंत समता चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. या समता चित्ररथाचा रायगड जिल्ह्यातील शुभारंभ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत महाड येथील चवदार तळे येथे झाला. त्यानंतर आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना श्री.बडोले बोलत होते. याप्रसंगी खासदार अमर साबळे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार भाई गिरकर, महाड नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील कविसकर आदी उपस्थित होते. श्री.बडोले म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 12...

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांना अर्थसहाय्याच्या विविध योजना

ग्राम विकास विभाग राज्यातील जिल्हा परिषदेमार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना त्यांना दारिद्र्यरेषेपासून वर आणण्यास सहाय्यभूत ठरतील, अशा अर्थसहाय्याच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांमुळे संबंधित लाभार्थ्यांना फायदा होऊन त्यांचा आर्थिक स्तर पर्यायाने सामाजिक स्तर उंचावण्यास होऊ शकतो. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यत ही योजना पोहोचवून त्याचा लाभ त्यांनी घ्यावा यासाठी ही माहिती... रायगड जिल्ह्यातील अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांचे कृषी उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्र्यरेषेवर आणण्यास सहाय्य करण्याच्या दृष्टीने शासनाच्या कृषी विभागामार्फत विशेष घटक योजना सन 1982 पासून राज्यात राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत जमीन सुधारणा, निविष्ठा वाटप, पीक संरक्षण शेतीची सुधारित औजारे, बैलगाडी, बैलजोडी, रेडेजोडी, इनवेल बोअरिंग, जुनी विहीर दुरूस्ती, पाईप लाईन, पंपसंच, नवीन विहीर, शेततळे, परसबाग लागवड, तुषार सिंचन, ठिबक सिंचन संच, ताडपत्री या बाबींवर लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचे कृषी उत्पादन वाढीस मदत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. लाभार्थ्यां...

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध योजना

अनुसूचित जाती व नवबौद्ध नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने 10 जुलै 1978 रोजी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची स्थापना केली. हे महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत आहे. महामंडळाचे अधिकृत भागभांडवल 500 कोटी रुपयांचे असून 51 टक्के भांडवल राज्य शासन व 49 टक्के भागभांडवल केंद्र शासनाचे आहे. महामंडळ केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना राबवित असून महामंडळाला निधी राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त होतो. महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे असून सर्व जिल्ह्यात जिल्हा कार्यालये व विभागीय स्तरावर प्रादेशिक कार्यालये कार्यरत आहेत.      तसेच  महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील नवबौद्ध, खाटीक, होलिया, मेहतर, वाल्मिकी, बुरड या समाजातील सुशिक्षित व अशिक्षित बेरोजगार युवक व युवतीकरीता स्वयंरोजगार करुन त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने विविध योजना राबविण्यात येतात. प्रशिक्षण योजना अनुसूचित जातीच्या लाभधारकास व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संब...

दुर्बलांना सामाजिक न्याय विभागाचा आधार

इमेज
राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांचे कल्याण व जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना शिक्षण-प्रशिक्षण देऊन आर्थिक प्राप्तीत वाढ होण्याकरिता विविध साधने व सामग्रीचा पुरवठा करणारा असा हा महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय विभाग आहे. त्यासाठी या विभागामार्फत अनेक लोकाभिमुख योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. कोल्हापूर जिल्ह्यात या विभागामार्फत विविध कल्याणकारी योजना राबवण्यात येत असून त्याचा लाभ अनेक लाभार्थींनी घेतला आहे. पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना • सन 2006 पासून मार्च 2015 पर्यंत 39 जणांनी लाभ घेतला आहे. • या योजनेंतर्गत लाभार्थीला 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायत जमीन देण्यात येते. • जमीन खरेदीसाठी शासनाकडून 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज देण्यात येते. • कर्जफेडीची मुदत 10 वर्षे असून कर्जफेड कर्ज मंजुरीनंतर 2 वर्षांनी सुरू करावयाची आहे. • या योजनेसाठी लाभार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांतील व दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा. • या योजनेंतर्गत विधवा व परित्यक्त्यांना प्राधान्य...

नव्वद टक्के अनुदानावर मिनीटॅक्टर....शासनाचा महत्वपूर्ण उपक्रम !

गरजांच्या मागणीनुसार आधुनिक शेती ही काळाची गरज आहे. साहजिकच आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्याचे शासनाचे महत्वपूर्ण धोरण आहे. तर दुसरीकडे स्वयं रोजगाराला प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील आर्थिक दुर्बल तसेच वंचित मागासवर्गीय घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबर घेऊन विकासाकडे वाटचाल करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. या सर्व प्रयत्नांचाच परिपाक म्हणजे शासन पातळीवरून या तिन्ही उद्देशांचा सुवर्णमध्य साधला जाणाऱ्या अनेक योजना कार्यान्वित आहेत. त्यापैकी समाज कल्याण विभागाची 90 टक्के अनुदानावर मिनी टॅक्टर व शेती उपयोगी उपसाधने यांचा पुरवठा करणारी योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील बचत गटांना या योजनेंतर्गत मिनी टॅक्टर व शेती उपयोगी उपसाधने यांचा पुरवठा करून बचत गटांच्या व्यवसाय निर्मिती व उत्पादन वाढीला चालना देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. बचत गटांच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रम चांगल्या पद्धतीने राबविता येऊ शकतात. तसेच तळागाळातील जनतेला या उपक्रमांचा उत्तमरित्या लाभ मिळू शकतो...

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या

अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, शिक्षण घेताना त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी विविध शिष्यवृत्या महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येतात. या शिष्यवृत्तींविषयी माहिती देणारा हा लेख... माध्यमिक शाळेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते 7 वीमधील 2 गुणवत्ताधारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता 8 वी ते 10 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिल्या दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी मान्यताप्राप्त प्राथमिक/माध्यमिक शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या वर्गामध्ये शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी असावा. ही शिष्यवृत्ती मागील वार्षिक परीक्षेत कमीत कमी 50 टक्के व त्याहून अधिक गुण मिळवून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून प्रथम व द्वितीय क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल. या शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट राहणार नाही. यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शाळेतील नियमित हजेरी, समाधानकारक प्रगती व चांगली वर्तणूक असल्यास मंजूर करण्यात येईल. ...