पोस्ट्स

मुक्तपीठ लेबलसह पोस्ट दाखवत आहे

पोलीस ठाण्याचा पाहूणचार

इमेज
सन 2004 मध्ये मी पुणे विद्यापीठात ‘जनसंज्ञापन व पत्रकारिता’ या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होतो. ‘रानडे इन्स्टिट्यूट’ मध्ये शिकत असतांना ‘झी- न्यूज व तालीम’ या माध्यम संस्थेचा ‘विद्यार्थी सर्वेक्षक’ म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. सन 2004 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. यासाठी निकालापूर्वीच्या जनमत चाचणी साठी डाटा जमा करण्याचे काम या सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात येत होते. संबंधित संस्थेकडून आम्हा पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सदर सर्वेक्षणासाठी रितसर प्रशिक्षण ही देण्यात आले होते.                 पुण्यातील विश्रामबाग परिसरातील एका मतदान केंद्राबाहेर मला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. मतदान केंद्रावर आखलेल्या सीमारेषेच्या बाहेर मतदान करून आलेल्या नागरिकांना भेटून त्यांचा कल जाणून घेण्यासाठी प्रश्नावली मी भरून घेत होतो. या सर्वेक्षणास माननीय न्यायालयाने ही मान्यता दिलेली होती. असे असतांना ही गस्तीवर असलेले विश्रामबाग पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अर्जुन संकुडे व त्य...
इमेज
फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा ! डॉ.जगन्नाथ दिक्षित यांच्या ‘विनासायास वेटलॉस’ थेअरी चा सर्वसामान्यांना फायदा फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा, अशी अनोखी आहारपध्दती औरंगाबादचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी शोधून काढली आहे. ‘विनासायास वजन कमी’ करण्याच्या या आहारपध्दतीचे ४० डॉक्टरांसह ५०० जणांवर यशस्वी प्रयोग करून त्यांनी हे सिद्ध केले आहे. यासाठी त्यांनी ‘स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत’ ही चळवळ   सुरू केली आहे.   २०० च्या वर व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची ही अनोखी आहार पध्दती ऐकण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. 2 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता कालिदास नाटयगृहात ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची   ही आहार संशोधन पध्दती काय आहे ?   आणि या आहारपध्दतीचा वापर करून आपले वजन आश्चर्यकारक रित्या कमी केलेल्या नाशिक मधील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया आपण या लेखात जाणून घेणार आहोत...
इमेज
‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणा ‘स्व’ च्या आस्तित्वाचा शोध…..! गूढ, अगम्य अनूभुतीची प्रचिती ! नाशिक समाज कल्याण विभागाचे 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवार, दि.19 ऑगस्ट 2018 रोजी ‘ब्रह्मगिरी’ ची लहान व मोठी प्रदक्षिणा पूर्ण केली. यात 24 पुरूष अधिकारी व कर्मचारी मोठया प्रदक्षिणेत सहभागी झाले होते. तर उर्वरित सर्व महिला व पुरूष अधिकाऱ्यांनी लहान प्रदक्षिणा पूर्ण केली. ‘ब्रह्मगिरी’ व परिसराला निसर्गाने खरोखर मुक्तहस्ताने दान दिले आहे. ‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणा म्हणजे ‘स्व’ आस्तित्वाचा शोधच आहे. असे मी म्हणेण ! हा अनुभव इथे मांडण्याचा हा सर्व खटाटोप….             ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यास 7 वषापूर्वीच सुरूवात झाली होती. शासकिय विभागात कार्यरत राहून कायम नवोन्मेषाने विविध संकल्पना राबविणारे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आदरणीय राजेंद्र कलाल सर हे सातत्याने मागील 7 वर्षापासून ‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणेचे आयोजन करत आले आहेत. सन 2012 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या लहान प्रदक्षिणेत मी सहभागी झालो होतो. त्यानंतर सन 2016 मध्...

कळसुबाई शिखर सर करतांना एव्हरग्रीन ग्रुप, दि.१८ फेब्रुवारी २०१८

इमेज

”सामाजिक समतेसाठी शैक्षणिक संधी“ हा दै.सकाळ या वृत्तपत्रात दि.३० मे २०१६ रोजी प्रसिध्द झालेला माझा लेख

इमेज

सामाजिक न्याय वर्षाची फलश्रृती…!

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षा निमित्त शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने राबविलेले उपक्रम, योजना, घेतलेले निर्णय, राबविलेले कार्यक्रम यांचा विस्तृत आढावा घेणारा लेख ! ------------------------------------------------------------------------------ सामाजिक न्याय वर्षाची फलश्रृती…!             भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्ताने शासनाच्या वतीने सन 2015-16 हे वर्ष ‘ सामाजिक न्याय व समता वर्ष’ म्हणून साजरा केले जात आहे. या वर्षानिमित्त शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विविध ठोस उपक्रम राबविण्यात आले. शाश्वत विकासावर भर असलेले लोकोपयोगी निर्णय घेण्यात आले. सामाजिक न्याय वर्षासाठी शासनाने 125 कोटी रूपयांची तरतूद उपलब्ध करून दिली. सामाजिक न्याय व समता वर्षानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या  फलश्रृतीचा, यशस्वीतेचा घेतलेला हा आढावा !             अंध व्यक्तीला रस्ता ओलांडताना मदत करणे ही झाली समाजसेवा ! मात्र या अंध व...