शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा- प्रा. राम शिंदे
अहमदनगर : शासकीय अधिकाऱ्यांनी पदावर काम करीत असताना प्रामाणिकपणे आणि नि:पक्षपातीपणे शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून सामाजिक समता निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.
नियोजन भवनामध्ये राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत प्रा. शिंदे बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष हे `समता व सामाजिक न्याय वर्ष` म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने सामाजिक न्याय विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, महापालिकेचे आयुक्त विलास ढगे, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, समाजकल्याणचे सहायक आयुक्त माधव वाघ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, हर्षल आगळे आदी उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले, शासकीय धोरणांची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासन करीत असते. समाजातील सामाजिक न्यायाची दरी कमी करण्याची फार मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे. शासकीय योजनांचा लाभ वंचितांना देवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. प्रशासनाच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत विकास पोहोचू शकतो. एखादे पद असताना त्या पदाला न्याय दिला तर जनतेमध्ये त्या अधिकाऱ्यांविषयी आदराची भावना निर्माण होते, हे त्यांनी सोदाहरण सांगितले.
श्री. कवडे यांनीही माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांच्या हितासाठी पारदर्शीपणे, नि:पक्षपातीपणे, गतीमानतेने काम करण्याचे आवाहन केले. जनतेशी सौजन्याने, नम्रपणे वागून त्यांच्या मनात प्रशासनाविषयी विश्वास निर्माण केल्यास सुशासन निर्माण होवू शकते, असेही त्यांनी सांगितले.
श्री. नवाल यांनी महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचे आवाहन केले. अधिकाऱ्यांनी आपल्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या `फाईल` मागील `लाईफ` अनुभवायला हवे. आपल्या सकारात्मक निर्णयामुळे एखाद्याच्या जीवनात आनंद निर्माण होवू शकतो, असेही ते म्हणाले.
डॉ. त्रिपाठी यांनी राज्यघटनेत दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी पालन केल्यास भारत देश बलवान होवू शकतो, असे सांगितले.
प्रास्ताविक सहायक आयुक्त माधव वाघ यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल आगळे यांनी केले.
नियोजन भवनामध्ये राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत प्रा. शिंदे बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष हे `समता व सामाजिक न्याय वर्ष` म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने सामाजिक न्याय विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, महापालिकेचे आयुक्त विलास ढगे, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, समाजकल्याणचे सहायक आयुक्त माधव वाघ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, हर्षल आगळे आदी उपस्थित होते.
प्रा. शिंदे म्हणाले, शासकीय धोरणांची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासन करीत असते. समाजातील सामाजिक न्यायाची दरी कमी करण्याची फार मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे. शासकीय योजनांचा लाभ वंचितांना देवून त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. प्रशासनाच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत विकास पोहोचू शकतो. एखादे पद असताना त्या पदाला न्याय दिला तर जनतेमध्ये त्या अधिकाऱ्यांविषयी आदराची भावना निर्माण होते, हे त्यांनी सोदाहरण सांगितले.
श्री. कवडे यांनीही माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करुन लोकांच्या हितासाठी पारदर्शीपणे, नि:पक्षपातीपणे, गतीमानतेने काम करण्याचे आवाहन केले. जनतेशी सौजन्याने, नम्रपणे वागून त्यांच्या मनात प्रशासनाविषयी विश्वास निर्माण केल्यास सुशासन निर्माण होवू शकते, असेही त्यांनी सांगितले.
श्री. नवाल यांनी महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याचे आवाहन केले. अधिकाऱ्यांनी आपल्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या `फाईल` मागील `लाईफ` अनुभवायला हवे. आपल्या सकारात्मक निर्णयामुळे एखाद्याच्या जीवनात आनंद निर्माण होवू शकतो, असेही ते म्हणाले.
डॉ. त्रिपाठी यांनी राज्यघटनेत दिलेली कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे अधिकाऱ्यांनी पालन केल्यास भारत देश बलवान होवू शकतो, असे सांगितले.
प्रास्ताविक सहायक आयुक्त माधव वाघ यांनी केले. सूत्रसंचालन हर्षल आगळे यांनी केले.
टिप्पण्या