राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
व्यसनमुक्ती
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या
सामाजिक न्याय विभागामार्फत राष्ट्रपिता
महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार सन २०१५-२०१६ देण्यात येणार
आहे. तरी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या नाशिक जिल्ह्यामधील स्थानिक कार्यकर्त्यांना
पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लेखक, कवी, पत्रकार/संपादक, साहित्यिक,
सामाजिक कार्यकर्ते, किर्तनकार, प्रवचनकार, लोककलावंत, शासकीय अधिकारी/कर्मचारी,
निमशासकीय अधिकारी/कर्मचारी, सेवाभावी संस्था, युवामंडळे, महिला मंडळे, भजनी
मंडळे, बचतगट, व क्रीडा मंडळे,
शाळा/महाविद्यालय, वृत्तपत्रे, इलेक्ट्रानिक मिडीया, कारखाने, उद्योग व्यवस्थापन,
मंजूर संघटना या क्षेत्रात व्यसनमुक्ती क्षेत्रात एकूण ५१ पुरस्कार्थींना या
पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारासाठी पासपोर्ट आकाराचे रंगीत दोन
छायाचित्र, कामाची माहिती प्रसिद्ध झालेले वर्तमानपत्रातील कात्रणे, प्रशस्ती
पत्रके, पोलीस दाखला आदी माहितीसह नाशिक जिल्ह्यातील संस्था व कार्यकर्त्यांनी
विहित नमुन्यातील अर्ज दि. 3 सप्टेंबर 2015 पर्यंत दोन प्रतीत जिल्हा समाज कल्याण
अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक यांचे कार्यालय, जिल्हा परिषद भवन, त्र्यंबक नाका,
सीबीएस-नाशिक येथे सादर करावेत. असे आवाहन करण्यात येत आहे.
(श्री.सतिष वळवी)
जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद, नाशिक.
टिप्पण्या