शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा- प्रा. राम शिंदे

अहमदनगर : शासकीय अधिकाऱ्यांनी पदावर काम करीत असताना प्रामाणिकपणे आणि नि:पक्षपातीपणे शासकीय योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून सामाजिक समता निर्माण करावी, असे आवाहन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले. नियोजन भवनामध्ये राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत प्रा. शिंदे बोलत होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 125 वे जयंती वर्ष हे `समता व सामाजिक न्याय वर्ष` म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने सामाजिक न्याय विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, महापालिकेचे आयुक्त विलास ढगे, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, अपर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, समाजकल्याणचे सहायक आयुक्त माधव वाघ, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रदीप भोगले, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, हर्षल आगळे आदी उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले, शासकीय धोरणांची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासन ...