बातमी डिजिटल होत आहे--म्हणजे काय?
बातमी डिजिटल होत आहे--म्हणजे काय? [राहुल माने-०९६५४०९३३५९]
========================== =============
दररोज सकाळी उठल्यावर आपल्याला चहा हवा असतो आणि वर्तमानपत्र! हि आपली केवळ सवय नाही तर आपली जीवनशैली झाली आहे. गेली अनेक दशके हि आपली सवय, हि आपली जीवनशैली आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाली आहे. दररोज सकाळी आपली आई, आपली बहिण किंवा आपली बायको, किंवा आपली आजी आपल्याला चहा करून देणार आणि घरातले आपण म्हणजे लहान मुले, मोठी मुले-मुली, घरातील कर्ते-धर्ते, कमावणारी पुरुष मंडळी बसून आरामात चहा पिणार आणि जगातील घडामोडींचा आढावा घेणार. कदाचित आपल्या घरातील आपल्या बहिणींच्या, आईच्या, बायकोच्या किंवा चहा बनवणाऱ्या नोकरांच्या आयुष्यातील मनातील उलथापालथ, चलबिचल बरेच वेळा आपल्याला माहित नसेल पण आपल्याला जगभरातील घडामोडींचा आस्वाद चहाबरोबर घ्यायचा असतो. सकाळ, चहा आणि वर्तमानपत्रे हे एक प्रकारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे सरंजामी असे दुहेरी अवतरण चिन्ह होते आणि अजूनही ते आहे .
आज तंत्रज्ञान बदलत आहेत, माध्यमे बदलत आहेत आणि आपले आयुष्य सुद्धा बदलून जात आहे. आज डिजिटल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आज केवळ संवादाची भाषा बदलली नाही तर बातमीची, साहित्याची, मनोरंजनाची आणि इतिहास लिखाणाची भाषा व दिशा बदलत आहे, बदलली आहे. आज माध्यमे २४ तास, ३६५ तास सतर्क झाली आहेत, व्यावसायिक रित्या आणि पत्रकारितेच्या दृष्टीकोनात सुद्धा. पण त्याच वेळी आपली माहिती, बातमी आणि विश्लेषण ग्रहण करण्याच्या सवयींमध्ये सुद्धा बदल झाला आहे. या बदलांचे कारण आहे, वाढते शहरीकरण, आपले बदलून गेलेले आयुष्य, माध्यमांच्या विश्वामध्ये झालेले बदल, बातमीचे मनोरंजन मुल्य तयार होणे आणि मनोरंजनाचे बातमी मुल्य वाढणे या सारख्या अनेक घटनांमुळे आज आपण जगाकडे कसे पाहतो हे ठरते.
पूर्वी आपण बातम्या, प्रसारमाध्यमे आणि विश्लेषण यांच्या शोधात असायचो आता माध्यमे तुमच्या शोधात येतात. एफ. एम. रेडीओ वरचा सूत्रसंचालक, आपल्या सोशल मेडिया वरील न्यूज App, संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या मालिका पाहताना ज्या जाहिराती येतात त्या किंवा आपण रस्त्यावरून जाताना एखाद्या भिंतीवर एखाद्या कंपनीचे राजकीय सामाजिक संदर्भ वापरून रंगवलेले व्यापारी क्याम्पेन किंवा रिक्षा, ट्याकसी, बस मधून जाताना आपल्या सह्प्रवाश्याबरोबर होणारी आपली चर्चा...बातमी आपला पिच्छा सोडत नाही. ती नेहमी विक्रम-वेताळ मधील गोष्टी मधल्या वेताळासारखी आपला पिच्छा करून आपल्या खांद्यावर येउन बसते.
मग काय अर्थ आहे बातमी डिजिटल होण्याचा आणि त्या अर्थाने वृत्त आणि प्रकाशन व्यवसाय डिजिटल होण्याला... आज जसे ग्राहक नागरिक मनोरंजनासाठी हवे तेवढे पैसे मोजायला तयार आहेत, तेवढेच बातमी आणि इतर विश्लेषणात्मक माहितीसाठी खरेच तयार आहेत का? जर तयार नसतील तर का तयार नाहीत? आज माहिती तंत्रज्ञानाची साधने एवढी आधुनिक, सुलभ आणि सोपी झाली आहेत जग जाणून घेण्याला तरी आपली मानसिकता माहितीबद्दल अजूनही बदललेली नाही. त्यामुळे आज माध्यम विश्वातील कंपन्या, संस्था, जाहिरातदार संस्था या सर्व एक व्यावसायिक मॉडेल बनवण्यामध्ये व्यग्र आहेत. माध्यम हा स्वता एक स्वयंभू संदेश तर आहेच याशिवाय प्रत्येक माध्यमाची स्वताची एक ताकत असते त्या ताकदीनुसार प्रत्येक माध्यम ग्राहकांना, प्रेक्षकाना, श्रोत्याना, वाचकाना आणि नागरिकाना सतत खिळवून कसे ठेवू शकतील याचे प्रयत्न करत असते. त्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. व्हीडीओ-ऑडीओ-ग्राफिक्स-रंग ीत छायाचित्रे-माहितीची दालने-आकृत्या-नकाशे या सर्व रुपात माहिती-बातमी आपल्यासमोर येत आहे. गमतीची गोष्ट अशी कि ज्या वर्तमानपात्रांची आपल्याला सवय झाली होती त्याही पलीकडे आपल्याला आज इंटरनेट, स्मार्ट-फोन्स, ट्याबलेट्स यांच्या सहाय्याने जे वेब-सर्फिंग आपण करतो आणि त्याही पलीकडे आपल्या मोबाईल मध्ये जे Apps आपण डाऊनलोड करतो त्यांच्या मार्फत आपल्यापर्यंत येते, किंबहुना आपला पाठलाग करते.
आज मोठ्या मेट्रो शहरांपेक्षाही ग्रामीण, जिल्हा आणि तालुका त्याबरोबरच ग्रामीण भागातही इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आज मोबाईल हा "लेवल प्लेइंग फिल्ड" चा समानार्थी शब्द झाला आहे. कारण आता संवाद साधायला, एकत्रितपणे कार्यक्रमांचे नियोजन करायला, माहिती शोधायला, गाणी ऐकायला, गप्पा-चकाट्या मारायला, जगातील काना-कोपऱ्यातील घटनांचा बातम्यांचा शोध-वेध घ्यायला मजुरांना, विद्यार्थ्याना, गरिबांना, गृहीणीना, मागासवर्गीयाना (हा शब्द येथे विकासापासून वंचित या अर्थाने वापरला आहे) कोणत्याही मध्यम संस्थांच्या आणि ज्ञान संस्थांच्या आणि ज्ञानी लोकांच्या सरंजामशाहीपुढे मजबुरीने तळमळत बसावे लागणार नाही. हीच खरी तर आजच्या एकविसाव्या शतकातील महत्त्वाची क्रांती आहे. स्मार्ट-फोन्स मुळे किंवा इंटरनेट मुळे जगात कुठे कुठे लोकशाही आली हे माहित नाही, कांही लोक अरब स्प्रिंगचा या संदर्भात उल्लेख करतात, पण आपल्या घर-दारात, गल्ली-बोळात ज्यांच्यापर्यंत माहिती-ज्ञान शतकानुशतके पोचले नाही त्यांच्यापर्यंत ज्ञानक्रांती जरूर पोचली आहे.
मोठ्या माध्यम कंपन्या खरे तर याच बदलांचे स्वागत करून त्यांची उत्पादने-सेवा विकण्यासाठी सज्ज झाली आहेत. त्यांनी ओळखले आहे कि भारतीय ग्राहक अजूनही डिजिटल बातम्या आणि माहितीसाठी पैसे मोजायला तेवढा तयार नाही. आपल्याकडे वर्तमानपत्रे, मासिके, कादंबऱ्या, जीवनचरीत्रे, स्वयंपाकाची पुस्तके, प्रवास वर्णने बरीच खपतात. पण त्या प्रमाणात बातम्या आपल्यापर्यंत फुकट आल्या पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते. त्यामुळे कंपन्या किंवा माध्यम संस्था आता संस्कृतींचा अभ्यास अधिक करू लागली आहेत. एखादी माध्यम कंपनी जेव्हा तिचे App बनवते तेव्हा ते App जगभरातून डोउनलोड केले जाते, त्यामुळे कुणाला-कधी-काय-कसे वाचायला आवडते याचे संशोधन, याचे नियोजन, याचे नियमन, याचे निर्धारण करण्यासाठी कंपन्या लाखो-करोडो रुपये खर्च करत आहेत. त्याचबरोबर कोणत्याही नवीन माध्यम उत्पादनाची आणि सेवेची जाहिरात हि आज-कालच्या किंवा त्या-त्या वेळी गरम असलेल्या बातम्यांचा आधार घेऊन त्यापासून मार्केटिंग मोहीम चालवण्यात आज बरीचशी हुशार मंडळी आपला वेळ आणि आपली बुद्धिमत्ता खर्च करत आहेत.
मार्केटिंग किंवा ढोबळ अर्थाने ज्याला न्युरो-मार्केटिंग म्हणतात ती आज सर्व कंपन्यांची आवडती संकल्पना बनली आहे. आपण काय खातो, आपण कसा विचार करतो, आपण कुणाबरोबर फिरतो, उठतो, बसतो, गप्पा मारतो. आपणाला काय आवडते, आपणाला काय आवडत नाही--आपण कोणत्या गोष्टी enjoy करतो, कोणत्या गोष्टी आपल्यासाठी cool आहेत, याचा कंपन्या अभ्यास करत असतात आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्याची जोडून घेऊन आम्ही तुम्हाला ओळखतो मग आमचे उत्पादन-सेवा खरेदी करून आपले हे नाते दृढ करा असे आभासी अवसान आणतात या कंपन्या. आपल्याला बातम्या देणाऱ्या माध्यम संस्था, आपले मनोरंजन करणारी जाहिराती, मालिका-चित्रपट बनवणाऱ्या निर्मिती संस्था, त्यांचा प्रसार-प्रचार करणाऱ्या जनसंपर्क किंवा जाहिरात मोहिमा कंपन्या, या माध्यम माहिती ज्याला आपण data किंवा content म्हणतो त्याला इंटरनेटवर विशेष आकर्षक पद्धतीने मांडनारे किंवा सोशल मिडिया वर त्याची एक लाट तयार करणारे विशेषज्ञ या कंपन्या कामाला लावतात. त्याचबरोबर आपल्या माहिती ग्रहण करण्याच्या भुकेचा अभ्यास करणारे संगणकीय कार्यक्रम जोडीला आहेतच.
पण अलीकडे यामध्ये एक नवीन गोष्ट आली आहे, ती म्हणजे संगणकातून जे ज्ञान आले आहे त्याचा बोध लावण्यासाठी एका प्रकारे आपल्याला ग्राहकांच्या-वाचकांच्या आणि दर्शकांच्या संस्कृतीचा अंदाज आणि अभ्यास असावा लागतो. तो अभ्यास एका प्रकारे सुरु झाला आहे. व्यापारी अंगाने का होईना, कॉर्पोरेट जग आता संस्कृतीकडे अधिक गंभीरपाने पाहू लागली आहेत. आधी ती फक्त सणा-सुदीला साबणे-अत्तर-कपडे-गाड्या-घड ्याळे-दागिने या ढोबळ अर्थाने आपल्या मंगल समयीच्या उत्पादनांशी निगडीत होत्या पण आता संस्कृतीबद्दलची समाज हि उत्पादन विकण्यापलीकडे ग्राहकांच्या/वाचकांच्या जीवनातील कोणती महत्त्वाची गरज आपण भागवत आहोत किंवा कोणती महत्त्वाची पोकळी आपण भरून काढत आहोत याकडे या माध्यम/data/content कंपन्यांचे लक्ष आहे आणि हि आपल्या वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. त्याच्या नकारात्मक बाजूही बऱ्याच आहेत पण त्याबद्दल परत कधी तरी. तोपर्यंत enjoy your smartphone app
==========================
दररोज सकाळी उठल्यावर आपल्याला चहा हवा असतो आणि वर्तमानपत्र! हि आपली केवळ सवय नाही तर आपली जीवनशैली झाली आहे. गेली अनेक दशके हि आपली सवय, हि आपली जीवनशैली आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग झाली आहे. दररोज सकाळी आपली आई, आपली बहिण किंवा आपली बायको, किंवा आपली आजी आपल्याला चहा करून देणार आणि घरातले आपण म्हणजे लहान मुले, मोठी मुले-मुली, घरातील कर्ते-धर्ते, कमावणारी पुरुष मंडळी बसून आरामात चहा पिणार आणि जगातील घडामोडींचा आढावा घेणार. कदाचित आपल्या घरातील आपल्या बहिणींच्या, आईच्या, बायकोच्या किंवा चहा बनवणाऱ्या नोकरांच्या आयुष्यातील मनातील उलथापालथ, चलबिचल बरेच वेळा आपल्याला माहित नसेल पण आपल्याला जगभरातील घडामोडींचा आस्वाद चहाबरोबर घ्यायचा असतो. सकाळ, चहा आणि वर्तमानपत्रे हे एक प्रकारे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे सरंजामी असे दुहेरी अवतरण चिन्ह होते आणि अजूनही ते आहे .
आज तंत्रज्ञान बदलत आहेत, माध्यमे बदलत आहेत आणि आपले आयुष्य सुद्धा बदलून जात आहे. आज डिजिटल आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आज केवळ संवादाची भाषा बदलली नाही तर बातमीची, साहित्याची, मनोरंजनाची आणि इतिहास लिखाणाची भाषा व दिशा बदलत आहे, बदलली आहे. आज माध्यमे २४ तास, ३६५ तास सतर्क झाली आहेत, व्यावसायिक रित्या आणि पत्रकारितेच्या दृष्टीकोनात सुद्धा. पण त्याच वेळी आपली माहिती, बातमी आणि विश्लेषण ग्रहण करण्याच्या सवयींमध्ये सुद्धा बदल झाला आहे. या बदलांचे कारण आहे, वाढते शहरीकरण, आपले बदलून गेलेले आयुष्य, माध्यमांच्या विश्वामध्ये झालेले बदल, बातमीचे मनोरंजन मुल्य तयार होणे आणि मनोरंजनाचे बातमी मुल्य वाढणे या सारख्या अनेक घटनांमुळे आज आपण जगाकडे कसे पाहतो हे ठरते.
पूर्वी आपण बातम्या, प्रसारमाध्यमे आणि विश्लेषण यांच्या शोधात असायचो आता माध्यमे तुमच्या शोधात येतात. एफ. एम. रेडीओ वरचा सूत्रसंचालक, आपल्या सोशल मेडिया वरील न्यूज App, संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या मालिका पाहताना ज्या जाहिराती येतात त्या किंवा आपण रस्त्यावरून जाताना एखाद्या भिंतीवर एखाद्या कंपनीचे राजकीय सामाजिक संदर्भ वापरून रंगवलेले व्यापारी क्याम्पेन किंवा रिक्षा, ट्याकसी, बस मधून जाताना आपल्या सह्प्रवाश्याबरोबर होणारी आपली चर्चा...बातमी आपला पिच्छा सोडत नाही. ती नेहमी विक्रम-वेताळ मधील गोष्टी मधल्या वेताळासारखी आपला पिच्छा करून आपल्या खांद्यावर येउन बसते.
मग काय अर्थ आहे बातमी डिजिटल होण्याचा आणि त्या अर्थाने वृत्त आणि प्रकाशन व्यवसाय डिजिटल होण्याला... आज जसे ग्राहक नागरिक मनोरंजनासाठी हवे तेवढे पैसे मोजायला तयार आहेत, तेवढेच बातमी आणि इतर विश्लेषणात्मक माहितीसाठी खरेच तयार आहेत का? जर तयार नसतील तर का तयार नाहीत? आज माहिती तंत्रज्ञानाची साधने एवढी आधुनिक, सुलभ आणि सोपी झाली आहेत जग जाणून घेण्याला तरी आपली मानसिकता माहितीबद्दल अजूनही बदललेली नाही. त्यामुळे आज माध्यम विश्वातील कंपन्या, संस्था, जाहिरातदार संस्था या सर्व एक व्यावसायिक मॉडेल बनवण्यामध्ये व्यग्र आहेत. माध्यम हा स्वता एक स्वयंभू संदेश तर आहेच याशिवाय प्रत्येक माध्यमाची स्वताची एक ताकत असते त्या ताकदीनुसार प्रत्येक माध्यम ग्राहकांना, प्रेक्षकाना, श्रोत्याना, वाचकाना आणि नागरिकाना सतत खिळवून कसे ठेवू शकतील याचे प्रयत्न करत असते. त्यासाठी आता अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. व्हीडीओ-ऑडीओ-ग्राफिक्स-रंग
आज मोठ्या मेट्रो शहरांपेक्षाही ग्रामीण, जिल्हा आणि तालुका त्याबरोबरच ग्रामीण भागातही इंटरनेटचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. आज मोबाईल हा "लेवल प्लेइंग फिल्ड" चा समानार्थी शब्द झाला आहे. कारण आता संवाद साधायला, एकत्रितपणे कार्यक्रमांचे नियोजन करायला, माहिती शोधायला, गाणी ऐकायला, गप्पा-चकाट्या मारायला, जगातील काना-कोपऱ्यातील घटनांचा बातम्यांचा शोध-वेध घ्यायला मजुरांना, विद्यार्थ्याना, गरिबांना, गृहीणीना, मागासवर्गीयाना (हा शब्द येथे विकासापासून वंचित या अर्थाने वापरला आहे) कोणत्याही मध्यम संस्थांच्या आणि ज्ञान संस्थांच्या आणि ज्ञानी लोकांच्या सरंजामशाहीपुढे मजबुरीने तळमळत बसावे लागणार नाही. हीच खरी तर आजच्या एकविसाव्या शतकातील महत्त्वाची क्रांती आहे. स्मार्ट-फोन्स मुळे किंवा इंटरनेट मुळे जगात कुठे कुठे लोकशाही आली हे माहित नाही, कांही लोक अरब स्प्रिंगचा या संदर्भात उल्लेख करतात, पण आपल्या घर-दारात, गल्ली-बोळात ज्यांच्यापर्यंत माहिती-ज्ञान शतकानुशतके पोचले नाही त्यांच्यापर्यंत ज्ञानक्रांती जरूर पोचली आहे.
मोठ्या माध्यम कंपन्या खरे तर याच बदलांचे स्वागत करून त्यांची उत्पादने-सेवा विकण्यासाठी सज्ज झाली आहेत. त्यांनी ओळखले आहे कि भारतीय ग्राहक अजूनही डिजिटल बातम्या आणि माहितीसाठी पैसे मोजायला तेवढा तयार नाही. आपल्याकडे वर्तमानपत्रे, मासिके, कादंबऱ्या, जीवनचरीत्रे, स्वयंपाकाची पुस्तके, प्रवास वर्णने बरीच खपतात. पण त्या प्रमाणात बातम्या आपल्यापर्यंत फुकट आल्या पाहिजेत अशी आपली अपेक्षा असते. त्यामुळे कंपन्या किंवा माध्यम संस्था आता संस्कृतींचा अभ्यास अधिक करू लागली आहेत. एखादी माध्यम कंपनी जेव्हा तिचे App बनवते तेव्हा ते App जगभरातून डोउनलोड केले जाते, त्यामुळे कुणाला-कधी-काय-कसे वाचायला आवडते याचे संशोधन, याचे नियोजन, याचे नियमन, याचे निर्धारण करण्यासाठी कंपन्या लाखो-करोडो रुपये खर्च करत आहेत. त्याचबरोबर कोणत्याही नवीन माध्यम उत्पादनाची आणि सेवेची जाहिरात हि आज-कालच्या किंवा त्या-त्या वेळी गरम असलेल्या बातम्यांचा आधार घेऊन त्यापासून मार्केटिंग मोहीम चालवण्यात आज बरीचशी हुशार मंडळी आपला वेळ आणि आपली बुद्धिमत्ता खर्च करत आहेत.
मार्केटिंग किंवा ढोबळ अर्थाने ज्याला न्युरो-मार्केटिंग म्हणतात ती आज सर्व कंपन्यांची आवडती संकल्पना बनली आहे. आपण काय खातो, आपण कसा विचार करतो, आपण कुणाबरोबर फिरतो, उठतो, बसतो, गप्पा मारतो. आपणाला काय आवडते, आपणाला काय आवडत नाही--आपण कोणत्या गोष्टी enjoy करतो, कोणत्या गोष्टी आपल्यासाठी cool आहेत, याचा कंपन्या अभ्यास करत असतात आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्याची जोडून घेऊन आम्ही तुम्हाला ओळखतो मग आमचे उत्पादन-सेवा खरेदी करून आपले हे नाते दृढ करा असे आभासी अवसान आणतात या कंपन्या. आपल्याला बातम्या देणाऱ्या माध्यम संस्था, आपले मनोरंजन करणारी जाहिराती, मालिका-चित्रपट बनवणाऱ्या निर्मिती संस्था, त्यांचा प्रसार-प्रचार करणाऱ्या जनसंपर्क किंवा जाहिरात मोहिमा कंपन्या, या माध्यम माहिती ज्याला आपण data किंवा content म्हणतो त्याला इंटरनेटवर विशेष आकर्षक पद्धतीने मांडनारे किंवा सोशल मिडिया वर त्याची एक लाट तयार करणारे विशेषज्ञ या कंपन्या कामाला लावतात. त्याचबरोबर आपल्या माहिती ग्रहण करण्याच्या भुकेचा अभ्यास करणारे संगणकीय कार्यक्रम जोडीला आहेतच.
पण अलीकडे यामध्ये एक नवीन गोष्ट आली आहे, ती म्हणजे संगणकातून जे ज्ञान आले आहे त्याचा बोध लावण्यासाठी एका प्रकारे आपल्याला ग्राहकांच्या-वाचकांच्या आणि दर्शकांच्या संस्कृतीचा अंदाज आणि अभ्यास असावा लागतो. तो अभ्यास एका प्रकारे सुरु झाला आहे. व्यापारी अंगाने का होईना, कॉर्पोरेट जग आता संस्कृतीकडे अधिक गंभीरपाने पाहू लागली आहेत. आधी ती फक्त सणा-सुदीला साबणे-अत्तर-कपडे-गाड्या-घड
टिप्पण्या