महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,२०१५ दि. २८ एप्रिल २०१५ लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स - सप्टेंबर ०४, २०१५ महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम वसमयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि पात्र व्यक्तींना लोकसेवा देणा-या शासकीय विभागामध्ये वअधिकरणामध्ये आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणांमध्येपारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी आणितत्संबंधित व तदानुषंगिक बाबीकरिता तरतूद करण्यासाठीएक सर्वसमावेशक कायदा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 दि. २८ अप्रिल २०१५ पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. या कायद्याचे ठळक उद्देश खालीलप्रमाणे आहेत. सार्वजनिक प्राधिकरणाने अधिसुचित केलेल्या कालमर्यादेच्या आत लोक्सेवा प्राप्त करण्यासाठी पात्र व्यक्तींना हक्क् प्रदान करणे. पदनिर्देशित अधिक-यांनी पात्र व्यक्तींला नियत कालमर्यादेच्या आत लोक्सेवा देण्यासाठी तरतूद करणे; सार्वजनिक प्राधिकरणांना, लोकसेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपील प्राधिकारी आणि नियत कालमर्यादा या कायद्यान्वये अधिसुचित करणे अनिवार्य आहे. पात्र व्यक्तीने केलेल्या अर्जास विशिष्ट अर्ज क्रमांक देण्यासाठी तरतुद करणे जेणेकरुन तो त्याच्या अर्जाच्या स्थितीची आनलाईन पाहाणी करु शकेल. प्रथम अपील प्राधिकारी, द्वितीय अपील प्राधिकारी आणि आयोगाकडे अपील करण्यासाठी तरतूद करणे; या कायद्याच्या प्रभावी अंमलब्जावणीसाठी महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग घटित करणे; नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा देण्यात कसूर करणा-या अधिका-यांच्या बाबतीत शास्ती व शिस्तभंगाची कारवाई करण्याकरीता तरतूद करणे; नियत कालमर्यादेच्या आत लोकसेवा देणा-या अधिका-यांना रोख रकमेच्या स्वरुपात प्रोत्साहने देणे आणि या कायद्याची प्रयोजने साध्य करताना जी प्राधिकरणे उत्कृष्ट कामगिरी पार पाडतील अशा प्राधिकरणांना गोरव करण्यासाठी योग्य पारितोषिके देणे याची तरतूद करणे; आणि जाणूनबुजूनखोटी किंवा चुकीची माहिती किंवा खोटे दस्तेवज देऊन लोक्सेवा मिळविणा-या पात्र व्यक्तीविरुध्दकारवाई करण्याची तरतूद करणे. लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स टिप्पण्या
माहिती अधिकारात त्रयस्थ पक्ष/व्यक्तीबाबत मागणी केलेली माहिती देता येत नाही. याबाबतचा महत्त्वपूर्ण शासननिर्णय दि.17 ऑक्टोंबर 2014 - सप्टेंबर ०३, २०१५ अधिक वाचा
टिप्पण्या