पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

‘बाप माणूस’ साकारतांना….

इमेज
‘बाप माणूस’ साकारतांना…. समाज कल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त सन्माननीय राजेंद्र कलाल साहेब 30 सप्टेंबर 2018 रोजी 32 वर्षाच्या निस्पृह व समाजाभिमुख शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने त्यांच्या प्रशासकीय व सामाजिक वाटचालीवर प्रकाश टाकणारी पुस्तिका छापण्याची इच्छा श्री.भागवत पाटील साहेब यांनी माझ्याकडे व्यक्त केली. त्यानंतर या इच्छेवर अनेकांनी दुजारा दिला आणि ‘बाप माणूस’ स्मरणिकेच्या निर्मितीस सुरूवात झाली. ‘बाप माणूस’ ही 112 पानांची ‘स्मरणिका’ प्रसिध्द करण्याची प्रक्रिया साधी - सोपी नव्हती. संपूर्ण फोर कलर मध्ये ही ‘स्मरणिका’ प्रसिध्द करण्याचा मनोदय सेवापूर्ती आयोजन सोहळा समितीचे एक प्रमुख सदस्य श्री.राजेंद्र कांबळे यांनी माझ्याकडे व्यक्त केला. त्यादृष्टीने आम्ही शहरातील अनेक नावाजलेल्या प्रिंटीग युनिट, प्रकाशन संस्थांना भेटी दिल्या. पण ‘स्मरणिका’ छापण्याचा खर्च सेवापूर्ती आयोजन सोहळा समितीच्या आवाक्यात येत नव्हता. त्यामुळे आम्ही निराश, हताश झालो होतो. मात्र आता एकदा मनात केलेला निश्चयापासून माघार घ्यायची नाही. अशी मनाशी खुणगाठ बांधली. आणि नव्याने त्यादृष्टीने श...
इमेज
फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा ! डॉ.जगन्नाथ दिक्षित यांच्या ‘विनासायास वेटलॉस’ थेअरी चा सर्वसामान्यांना फायदा फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा, अशी अनोखी आहारपध्दती औरंगाबादचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी शोधून काढली आहे. ‘विनासायास वजन कमी’ करण्याच्या या आहारपध्दतीचे ४० डॉक्टरांसह ५०० जणांवर यशस्वी प्रयोग करून त्यांनी हे सिद्ध केले आहे. यासाठी त्यांनी ‘स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत’ ही चळवळ   सुरू केली आहे.   २०० च्या वर व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची ही अनोखी आहार पध्दती ऐकण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. 2 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता कालिदास नाटयगृहात ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची   ही आहार संशोधन पध्दती काय आहे ?   आणि या आहारपध्दतीचा वापर करून आपले वजन आश्चर्यकारक रित्या कमी केलेल्या नाशिक मधील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया आपण या लेखात जाणून घेणार आहोत...
इमेज
‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणा ‘स्व’ च्या आस्तित्वाचा शोध…..! गूढ, अगम्य अनूभुतीची प्रचिती ! नाशिक समाज कल्याण विभागाचे 100 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवार, दि.19 ऑगस्ट 2018 रोजी ‘ब्रह्मगिरी’ ची लहान व मोठी प्रदक्षिणा पूर्ण केली. यात 24 पुरूष अधिकारी व कर्मचारी मोठया प्रदक्षिणेत सहभागी झाले होते. तर उर्वरित सर्व महिला व पुरूष अधिकाऱ्यांनी लहान प्रदक्षिणा पूर्ण केली. ‘ब्रह्मगिरी’ व परिसराला निसर्गाने खरोखर मुक्तहस्ताने दान दिले आहे. ‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणा म्हणजे ‘स्व’ आस्तित्वाचा शोधच आहे. असे मी म्हणेण ! हा अनुभव इथे मांडण्याचा हा सर्व खटाटोप….             ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करण्यास 7 वषापूर्वीच सुरूवात झाली होती. शासकिय विभागात कार्यरत राहून कायम नवोन्मेषाने विविध संकल्पना राबविणारे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त आदरणीय राजेंद्र कलाल सर हे सातत्याने मागील 7 वर्षापासून ‘ब्रह्मगिरी’ प्रदक्षिणेचे आयोजन करत आले आहेत. सन 2012 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या लहान प्रदक्षिणेत मी सहभागी झालो होतो. त्यानंतर सन 2016 मध्...

अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचाराच्या निवारणासाठी ॲट्रोसिटी कायदा !

अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तींवर केलेल्या जाणाऱ्या अत्याचारांच्या अपराधाच्या प्रतिबंध करण्यासाठी, अशा अत्याचाराचे खटले चालविण्यासाठी विशेष न्यायालय स्थापन करणे आणि अशा अपराधांना बळी पडलेल्यांना अर्थसहाय्य करणे व त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी दिनांक 11 सप्टेंबर 1989 रोजी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती   (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, 1989 संमत करण्यात आला. सदर अधिनियमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 30 जानेवारी 1990 पासून सुरू करण्यात आली. ॲट्रोसिटी कायदा होण्यापूर्वी 34 वर्षापूर्वी नागरी हक्क संरक्षण अधिनियम - 1955 हा कायदा अस्पृश्यतेला खतपाणी देणाऱ्या अपराधास प्रतिबंध करण्यासाठी आस्तित्वात होता. या   कायद्याने अस्पृश्यता पाळणे व ती पाळण्यास उत्तेजन देणे हा गुन्हा समजण्यात आला आहे. हा कायदा फक्त अनुसूचित जाती प्रवर्गाच्या अत्याचारापुरता सिमीत होता. तसेच या कायद्यातील काही तरतूदींमुळे ह्या कायद्याचा समाजात वचक राहिला नाही. त्याकारणाने अनुसूचित जाती-जमातींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे भारत सरकार ला लक्षात आल्यावर सामाजिक समता प्रस्थापित कर...