पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोकशाहीच्या कर्तव्यासाठी दिव्यांग बांधव सज्ज !

इमेज
विभागात 50 हजार दिव्यांग मतदारांची नोंद कोणाला हात नाही…. कोणाला पाय नाही…. तर कोणाला बोलता येत नाही…. तर कोणाला दिसत नाही....असे हरतऱ्हेचे दिव्यांगत्व वाट्याला आलेले आहे. असे असतांनाही मनात मात्र एक उत्साह, उमंग घेऊन दिव्यांग मतदार सुर्दृढ व समर्थ लोकशाही घडविण्यासाठीचे आपले कर्तव्य निभावण्यासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी   सोमवार, दिनांक 21 ऑक्टोंबर 2019 रोजी नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व अहमदनगर या पाचही जिल्हयात एकूण 50918 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी मतदान करावे. यासाठी निवडणुक प्रशासन सरसावले आहे. निवडणुक प्रशासनाच्या मदतीला विभागातील अनेक दिव्यांग स्वयंसेवी व सेवाभावी संस्थाही धावून आल्या आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावे. यासाठी पाचही जिल्हयातील दिव्यांग संस्थांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कार्यशाळांचे आयोजन केले आहे. गावा-गावात जाऊन मतदानांविषयी जनजागृती करत आहेत.   पथनाट्य, भित्ती...

पोलीस ठाण्याचा पाहूणचार

इमेज
सन 2004 मध्ये मी पुणे विद्यापीठात ‘जनसंज्ञापन व पत्रकारिता’ या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत होतो. ‘रानडे इन्स्टिट्यूट’ मध्ये शिकत असतांना ‘झी- न्यूज व तालीम’ या माध्यम संस्थेचा ‘विद्यार्थी सर्वेक्षक’ म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली. सन 2004 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या. यासाठी निकालापूर्वीच्या जनमत चाचणी साठी डाटा जमा करण्याचे काम या सर्वेक्षणाच्या माध्यमातून करण्यात येत होते. संबंधित संस्थेकडून आम्हा पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना सदर सर्वेक्षणासाठी रितसर प्रशिक्षण ही देण्यात आले होते.                 पुण्यातील विश्रामबाग परिसरातील एका मतदान केंद्राबाहेर मला सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. मतदान केंद्रावर आखलेल्या सीमारेषेच्या बाहेर मतदान करून आलेल्या नागरिकांना भेटून त्यांचा कल जाणून घेण्यासाठी प्रश्नावली मी भरून घेत होतो. या सर्वेक्षणास माननीय न्यायालयाने ही मान्यता दिलेली होती. असे असतांना ही गस्तीवर असलेले विश्रामबाग पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अर्जुन संकुडे व त्य...

सामाजिक स्थित्यरांचा वेध !

इमेज
आजच्या ‘ महाराष्ट्र टाईम्स ’च्या नाशिक आवृत्तीत मी वाचलेल्या ‘आयदान’ या आत्मचरित्राविषयी छापून आले आहे. मी लिहलेले मूळ पुस्तक परिचय या ठिकाणी वाचकांसाठी जसाच तसा देत आहे. --------------------------------------------------------------- उर्मिला पवार यांचे ‘आयदान’ हे आत्मचरित्र वाचले.   ‘आयदान’ हे एका दलित स्त्री लेखिकेने लिहलेले आत्मचरित्र आहे. यापूर्वी दलित लेखकांची ‘उपरा’, ‘उचल्या’, ‘बलुतं’ ही आत्मचरित्र बालपणीच वाचले आहेत. मात्र अलीकडच्या काळात पूर्णपणे कोठेही खंड न पडू देता ‘आयदान’ ही मी वाचलेले पहिले आत्मचरित्र.   पुण्याच्या ग्रंथाली प्रकाशनाने हे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे. प्लॅस्टिकचं युग येण्यापूर्वी बांबूपासून तयार केलेली सुपं, रोवळ्या, परड्या, हारे, करंडे इत्यादी वस्तूंना महत्त्व होतं. या सगळ्या वस्तूंना ‘आयदान’ किंवा आवतं म्हणतात. कोकणाबाहेर बुरूड नावाच्या भटक्‍या विमुक्‍त जातींचा पोट भरण्याचा हा व्यवसाय आहे. कोकणात हा व्यवसाय अनुसूचित जातींच्या यादीत असलेल्या महार या जातीकडे होता. बांबूच्या टोपल्या, सुपं व इतर वस्तू विणणे म्हणजे ‘ आयदान ’ . “ आईचे हे विण...