लोकशाहीच्या कर्तव्यासाठी दिव्यांग बांधव सज्ज !

विभागात 50 हजार दिव्यांग मतदारांची नोंद कोणाला हात नाही…. कोणाला पाय नाही…. तर कोणाला बोलता येत नाही…. तर कोणाला दिसत नाही....असे हरतऱ्हेचे दिव्यांगत्व वाट्याला आलेले आहे. असे असतांनाही मनात मात्र एक उत्साह, उमंग घेऊन दिव्यांग मतदार सुर्दृढ व समर्थ लोकशाही घडविण्यासाठीचे आपले कर्तव्य निभावण्यासाठी सज्ज झाला आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2019 सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी सोमवार, दिनांक 21 ऑक्टोंबर 2019 रोजी नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगांव व अहमदनगर या पाचही जिल्हयात एकूण 50918 दिव्यांग मतदारांची नोंद झाली आहे. जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी मतदान करावे. यासाठी निवडणुक प्रशासन सरसावले आहे. निवडणुक प्रशासनाच्या मदतीला विभागातील अनेक दिव्यांग स्वयंसेवी व सेवाभावी संस्थाही धावून आल्या आहेत. जास्तीत जास्त दिव्यांग मतदारांनी मतदान करावे. यासाठी पाचही जिल्हयातील दिव्यांग संस्थांच्या मदतीने जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कार्यशाळांचे आयोजन केले आहे. गावा-गावात जाऊन मतदानांविषयी जनजागृती करत आहेत. पथनाट्य, भित्ती...