पोस्ट्स

सप्टेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा ! डॉ.जगन्नाथ दिक्षित यांच्या ‘विनासायास वेटलॉस’ थेअरी चा सर्वसामान्यांना फायदा फक्त दोन वेळा खा आणि वजन कमी करा, अशी अनोखी आहारपध्दती औरंगाबादचे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी शोधून काढली आहे. ‘विनासायास वजन कमी’ करण्याच्या या आहारपध्दतीचे ४० डॉक्टरांसह ५०० जणांवर यशस्वी प्रयोग करून त्यांनी हे सिद्ध केले आहे. यासाठी त्यांनी ‘स्थूलत्व आणि मधुमेहमुक्त भारत’ ही चळवळ   सुरू केली आहे.   २०० च्या वर व्हॉट्सॲप ग्रुप स्थापन करून व फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ अठ्ठावीस हजार माणसांपर्यंत पोहोचली आहे. डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची ही अनोखी आहार पध्दती ऐकण्याची संधी नाशिककरांना उपलब्ध झाली आहे. 2 सप्टेंबर 2018 रोजी सायंकाळी 5.30 वाजता कालिदास नाटयगृहात ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने डॉ.जगन्नाथ दिक्षित यांची   ही आहार संशोधन पध्दती काय आहे ?   आणि या आहारपध्दतीचा वापर करून आपले वजन आश्चर्यकारक रित्या कमी केलेल्या नाशिक मधील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया आपण या लेखात जाणून घेणार आहोत...