पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

समाज कल्याण विभागात राबविला जातोयं प्रशासकीय सुधारणांचा 'नारनवरे पॅटर्न' !

  महाराष्ट्रात चहांदे, लखीना व दळवी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आडनांवाने ओळखले जाणारे पॅटर्न प्रशासकीय सुधारणा व गतिमानतेत नावाजलेले आहेत. जनतेप्रती प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करणे,   उत्तरदायीत्वाची भावना निर्माण करून प्रशासन अधिक जलद करणे हे उदिष्टये या सर्व पॅटर्नची होती. राज्याच्या समाज कल्याण विभागात प्रशासनात सुधारणा आणणाऱ्या अशाच एका पॅटर्नची सध्या राज्यभर चर्चा आहे. तो पॅटर्न आहे नारनवरे पॅटर्न ! सध्या समाजकल्याण विभागाच्या राज्यातील कोणत्या कार्यालयात नुसता फेरफटका मारला तर आपणास एकही कागद अस्ताव्यस्त पडलेला दिसणार नाही. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर मोजक्याच फाईल , टेबलावर अधिकारी-कर्मचारी नाव असलेली पाटी , जॉबचार्ट , प्रत्येकाच्या गळ्यात ओळखपत्र, कार्यालयाच्या दर्शनी भागात योजनांचे संक्षिप्त गोषवारा असलेलं फलक, माहिती अधिकार 1 ते 17 मुद्यांची माहिती, नागरिकांची सनद व येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांशी विन्रमतेने वागणारे अधिकारी व कर्मचारी असे चित्र तुम्हाला दिसून येईल. हे सर्व बदल घडवून आणण्याचं श्रेय समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांना जा...