माहितीचा अधिकार अधिनियम-२००५
माहितीचा अधिकार’ हा अष्टाक्षरी मंत्र १२ ऑक्टोबर, २००५ रोजी भारतीय जनतेला मिळाला. या मंत्राचा वापर करुन प्रशासनातील दोष, उणिवा, गैरप्रकार उघड करण्यात आले. देशातील अनेक कायदे हे जनतेने पाळायचे आणि प्रशासनाने त्यावर लक्ष ठेवायचे असे आहेत, माहितीचा अधिकार हा एकमेव कायदा असा आहे की, लोकप्रशासनाने तो पाळावयाचा असून जनतेची त्यावर नजर असणार आहे. या कायद्यामुळे भ्रष्टाचार पूर्णपणे संपणार नसला तरी त्याचे प्रमाण निश्चितच कमी होणार आहे. लोकप्रशासन केवळ वस्तुनिष्ठ असून उपयोगाचे नाही तर ते आदर्शवादी असायला हवे. प्रशासनाचा जनतेशी संबंध येतो. जनकल्याणाची कामे करतांना प्रशासकीय यंत्रणा समाजाभिमुख असली तरच जनतेला हे प्रशासन आपले वाटेल. गेल्या काही वर्षात विविध नागरी संघटना, नागरिकांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून सुप्रशासन निर्मितीचा प्रयत्न केला. शासकीय किंवा निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांच्या कामकाजात जास्तीत जास्त पारदर्शक...