डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष
वंचितांच्या सामाजिक न्यायच्या दिशेने… राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटक, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. सामाजिक न्याय विभागाने वंचित घटकांसाठी राबविलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून वंचित/मागासलेला समाज मुख्य प्रवाहात समावेशीत झाला आहे. त्याच्या जीवनमानात बदल झाला आहे. नाशिक विभागात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनेक भरीव उपक्रम / योजना गेल्या काही वर्षापासून सातत्याने राबविण्यात येत आहेत. दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास योजनांच्या अंमलबजावणीस बळकटी प्राप्त होते. त्यादृष्टीने विभागाने भरीव अशा दर्जेदार पायाभूत सुविधांची उभारणी केली आहे. भारतीय सामाजिक व्यवस्थेत महाराष्ट्र राज्याने देशाला महान समाजसुधारक दिलेत. कल्याणकारी राज्यकर्ते दिलेत. त्यामध्ये छ.शिवाजी महाराज, म.ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांनी असमान दर्जा, असमान संधी या व्यवस्थेला छेद देण्यासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे आरक्...