पोस्ट्स

विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देणारी ‘सारथी’!

राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी 2018 मध्ये छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची (सारथी) स्थापना करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रातील शाळा-महाविद्यालयीन शिक्षण शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षेचे परीक्षा पूर्व प्रशिक्षण, संशोधनासाठी फेलोशिप, रोजगार व स्वयं-रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण, शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि व कृषिपूरक कौशल्य विकास प्रशिक्षण व मार्गदर्शन इत्यादी प्रकारचे विविध कल्याणकारी उपक्रम व योजना राबविण्याचे काम सारथी संस्थेमार्फत केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा स्वप्नांना बळ मिळत आहे... 'शाहू विचारांना देऊया गती, साधूया सर्वांगीण प्रगती’ हे ब्रीद घेवून काम करणाऱ्या ‘सारथी’चे मुख्य कार्यालय पुणे येथे असून कोल्हापूर येथे उपकेंद्र आहे. संस्थेचे काम अधिक गतीने, सुलभरित्या होण्यासाठी कोल्हापूर उपकेंद्र, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई (खारघर नवी मुंबई) व लातूर अशी एकूण...

अद्रकाची शेती दोन एकरावर, उत्पन्न मिळाले १० लाखांवर ! नंदुरबारच्या जितेंद्र पाटलांच्या ‘वावर ची पॉवर’

इमेज
अवकाळी पाऊस, निसर्गाची अनिश्चितता, नापिकी, वातावरणातील बदल यामुळे पारंपरिक शेती अडचणीत आल्याचे चित्र एकीकडे असताना महाराष्ट्रातल्या नंदुरबारसारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे.  नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पावणे दोन एकरात आले शेतीच्या प्रयोगातून लाखोंची कमाई, जितेंद्र पाटलांनी करून एक नवा आदर्श शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या दुर्गम भागातील शेतकरी नव्या वाटांवर चालण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. शेतकरी जितेंद्र पाटील यांनी असाच एक प्रयोग केला आहे. पारंपारिक शेतीमध्ये अनेकदा फायदा कमी आणि नुकसान जास्त होते. पांरपारिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकरी विविध प्रयोग करत असतात. काही शेतकऱ्यांनी तर मिश्र शेतीकडे मोर्चा वळवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी प्रामुख्याने मिरचीच्या शेतीला प्राधान्य देतात. हा जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेपासून जवळ असल्यानं शेतकऱ्यांना देखील तेथील बाजारपेठांचा मोठ्या प्रमाणावर  फायद...

समाज कल्याण विभागात राबविला जातोयं प्रशासकीय सुधारणांचा 'नारनवरे पॅटर्न' !

  महाराष्ट्रात चहांदे, लखीना व दळवी हे जिल्हाधिकाऱ्यांच्या आडनांवाने ओळखले जाणारे पॅटर्न प्रशासकीय सुधारणा व गतिमानतेत नावाजलेले आहेत. जनतेप्रती प्रशासनात संवेदनशीलता निर्माण करणे,   उत्तरदायीत्वाची भावना निर्माण करून प्रशासन अधिक जलद करणे हे उदिष्टये या सर्व पॅटर्नची होती. राज्याच्या समाज कल्याण विभागात प्रशासनात सुधारणा आणणाऱ्या अशाच एका पॅटर्नची सध्या राज्यभर चर्चा आहे. तो पॅटर्न आहे नारनवरे पॅटर्न ! सध्या समाजकल्याण विभागाच्या राज्यातील कोणत्या कार्यालयात नुसता फेरफटका मारला तर आपणास एकही कागद अस्ताव्यस्त पडलेला दिसणार नाही. प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलावर मोजक्याच फाईल , टेबलावर अधिकारी-कर्मचारी नाव असलेली पाटी , जॉबचार्ट , प्रत्येकाच्या गळ्यात ओळखपत्र, कार्यालयाच्या दर्शनी भागात योजनांचे संक्षिप्त गोषवारा असलेलं फलक, माहिती अधिकार 1 ते 17 मुद्यांची माहिती, नागरिकांची सनद व येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांशी विन्रमतेने वागणारे अधिकारी व कर्मचारी असे चित्र तुम्हाला दिसून येईल. हे सर्व बदल घडवून आणण्याचं श्रेय समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांना जा...

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मुला-मुलींना भारतातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी ‘राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती’

इमेज

दिव्यांग, अनाथ व वंचित विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन (Online) करियर गाईडन्...

इमेज

इयत्ता १ ली ते १० वीच्या शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना - Maharashtra ...

इमेज

१० लाख तरूणांना रोजगार देणारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची महत्वाकांक्षी योजना

इमेज